विज्ञाननिष्ठ निबंध by V.D. SavarkarMy rating: 5 of 5 stars
आजही आपला सनातन धर्म किती श्रेष्ठ आहे हे मिरवत फिरणारे आपल्या आजू बाजूला दिसतील. वेद, ऋचा, स्मृती यांची स्तुती करणारे, ( अनेकांनी ज्याला कधी स्पर्शही केला नसेल, तसेसुद्धा) त्यातील जुनी संस्कृती आताच्या संस्कृती पेक्षा किती प्रगल्भ याचे गुणगान करताना दिसतील. रोग, गरिबी, दुसऱ्यांचा राग, दुष्काळ इत्यादी समस्यांसाठी यज्ञ, उपवास, दोरे गंडे असे उपाय योजणारे अनेक लोक तुम्हाला दिसतात. राग येतो पण तुम्ही अशा लोकांचा विरोध करता का?
अनेक जण नाही करत कारण? " कशाला कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये?" समजा विरोध केलाच तर आम्ही का चूक आहोत याची योग्य अशी कारणमीमांसा करता येणे कठीण असते. आणि जर जोराने / आवाज चढवून जर विरोध केला तर अनेकदा आपणच मूर्ख ठरून अपमानास पात्र ठरतो.
जर आपल्याला वरील उल्लेखलेल्या लोकांना विरोध करून आपला समाज विज्ञानाभिमुख करायचा असेल तर मुद्देसूदपणे आणि विज्ञानाच्या कसोटिंना धरून उत्तरे द्यावी लागेल.
सावरकरांनी तत्कालीन काळात जे समाजात धर्मभोळेपण पसरले, ते दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे ठेवून समाजावर टीका केली. त्यातील अनेक विषय आताच्या पिढीला सुध्या लागू होतात
1. गोपुजा
2. श्रुती- स्मृती- पुरणोक्त विरुद्ध up-to-date संस्कृती
3. यंत्र आणि बेकारी
4. यज्ञाची कुळकथा
5. ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?
आदी विषयांची दिमाखदार मांडणी केली. हा निबंधसंग्रह वाचनीय आहे.
यातील एक विषयाची अशी मांडणी केली....
गोपुजा हा सध्याचा गरम विषय आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर गायीपेक्षा जास्त उपयुक्त अनेक प्राणी आहे, मग गायीचीच पूजा का? गोपुजेच्या भाबड्या श्रध्देचा परकियांनी आक्रमण करताना सैन्यापुढे गायी ठेवून आपल्या हिंदू सैनिकांना मागे केलं. व आपण गोहत्या टाळण्यासाठी राष्ट्रहत्या केली. म्हणजे गोपुजा करत बसण्या ऐवजी कशी गोपालन केले तरी गायीचे उपयोग काडीमात्र कमी होणार नाही. श्रुतीत सांगितले म्हणून गोपुजा करत राहायची, श्रुतीत सांगितलं म्हणून यज्ञात तूप टाकायचे, शृतीत सांगितलं म्हणून प्रेत तिरडीवरच न्यायचं.
ह्या पुस्तकाला वाचताना कोणताही पूर्वग्रह मनात ठेवू नये. ....
View all my reviews














No comments:
Post a Comment